जेबीव्हीपीतील बालवारकऱ्यांचा हरिनामाच्या गजरात रिंगण सोहळा*

 इंदापूर (लाखेवाडी ): वारी ही महाराष्ट्रातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच .आषाढ महिन्याची चाहूल लागतात मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची .वारकरी सांप्रदायाने मराठीचा अभिमान बाळगला बोलीभाषेला वाद्मयीन प्रतिष्ठा मिळवून दिली फुगड्या ,पिंगा, भारुड, गवळणी, अभंग ओव्या कीर्तने अशा एक ना अनेक प्रकारांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. आषाढ महिन्यामध्ये पंढरीच्या वारीमध्ये हरिमय झालेले असंख्य वारकरीभक्त पायी वाट तुडवत,मुखामध्ये हरिनामाचा गजर करीत, अभंग गात, भजनात तल्लीन होऊन, देहभान विसरून, वातावरणाची समान बाळगता त्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पहात असतो.
        आजची पिढी ही सोशल मीडियाच्या प्रवाहात वाहत चालली असून; आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची,संतांची विद्यार्थ्यांना जाण व्हावी या उद्देशाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन जेबिव्हीपी प्रशालेमध्ये करण्यात आले होते. छोटे बाल वारकरी  विठ्ठल रूखमाई, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, मीराबाई संत तुकाराम महाराज, गोरा कुंभार ,वारकरी  पोशाखात येऊन संपूर्ण जेबीव्हीपी परिसर मंगलमय वातावरणामध्ये विठ्ठलमय झाला होता. संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे यांच्या हस्ते आरती करून प्रशालेतील बालवारकऱ्यांनी अभंगाच्या, हरिनामाच्या गजरात  टेकडीवरील विठुरायाच्या मंदिराकडे प्रस्थान केले. बालवारकऱ्यांनी टाळ घोषाच्या गजरात रिंगण सोहळा करून त्यामध्ये फुगडी खेळून वारीचा आनंद घेतला.   बालवारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
           यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, संस्थेच्या उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले ,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे ,संस्थेचे प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव ,विद्या निकेतन कॉलेज अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार ,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर , विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य सम्राट खेडकर ,संस्थेचे विश्वस्थ हृशी दादा ढोले सर्व प्रशालेचे सुपरवायझर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व बालवारकरी यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा नादमय, भक्तिमयपणे साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*